10 Jul 2009

कविराज भूषण - भाग १२ - सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं ... !

साजि चतुरंग बीर रंग में तुरंग चढी ।


सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं ।


भूषन भनत नाद बिहद नगारन कें ।


नदी नद मद गैबरन के रलत हैं ।


ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल ।


गजन की ठैल पैल सैल उसलत हैं ।


तारा सो तरनि धूरि धारा में लगत जिमि ।


थारा पर पारा पारावार यों हलत हैं ॥



... कविराज भूषण

भाषांतर :

{शिवराय सैन्यासह युद्धास निघाल्यावेळचा देखावा कवी भूषणांनी वर्णिलेला आहे}
सिंहासम शूर शिवराय चतुरंग सैन्य तयार करून विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्याकरीता निघालेले आहेत, नगार्‍याचा भयंकर ध्वनि होऊ लागलेला आहे, उन्मत्त हत्तींच्या गंडस्थलातून निघणारा मद नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे, सैन्याच्या खळबळीने देशभर गल्लोगल्लीत कोल्हाळ माजून राहिला आहे, हत्तिंच्या एकमेकांवर रेलण्यामूळे डोंगर उलथून पडतात की काय असे वाटत आहे. सैन्याच्या खळबळीने व हत्तींच्या परस्पर रेटारेटीने उडत असलेल्या धुळीने आकाश इतके भरून गेले आहे की एवढा मोठा प्रचंड सूर्य, पण एखाद्या लहानशा तार्‍याप्रमाणे दिसू लागलेला आहे. समुद्र तर ताटात धावणार्‍या पार्‍याप्रमाणे सारखा आंदोलन पावत आहे.

9 Jul 2009

कविराज भूषण - भाग ११ - माहादानी सिवाजी खुमान ... !



साहि तनै सरजा कि कीरती सों ।

चारों और चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है ।

भूषन भनत ऐसो भूप भौंसिला है ।

जाको द्वार भिच्छुकन सो सदाई भाइयतु है ।

माहादानी सिवाजी खुमान या जहान ।

पर दान के प्रमान जाके यों गनाइयतु है ।

रजत की हौस किए हेम पाइयतु जासो ।

हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥


... कविराज भूषण


भाषांतर :

शहाजी पुत्र शिवरायांच्या कीर्तिरूप चांदणीचा मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हे भोसलेराज असे आहेत की, भिक्षुकांना नेहमी त्यांच्या द्वाराशी पडून रहावेसे वाटते. या भूतलावर शिवाजी महाराज महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो.या छंदावरून शिवाजी महाराजांनी दानाप्रीत्यर्थ कविराज भूषणास हत्ती भेट दिलेला असावा असा तर्क करावयास जागा आहे.

7 Jul 2009

कविराज भूषण - भाग १० - भूषन भनत भाग्यो ... !

कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।

कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।

खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।

लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।

भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।

और कौन गिनती में भूली गति भब की ।

चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।

सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥


... कविराज भूषण

भाषांतर :

भूषण म्हणतो, कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब - त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरात "रब"ची द्वाही फिरवली (मुसलमानी चालविली). शहरातील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देवता खोदून खणून काढल्या. लाखो हिंदुंना बळाने मुसलमान केले, इतकेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होउन पळाले, महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची काय कथा ? अशा भयाण वेळी जर शिवराय नसते तर चारही वर्णांना आपापले धर्म सोडून नमाज पढावा लागला असता व सर्व हिंदुंची सुंता झाली असती.

4 Jul 2009

कविराज भूषण - भाग ९ - गर सिवाजी न होते तो ... !

देवल गिराविते, फिराविते निसान अली ।
ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।
गौर गणपती आप, औरनको देत ताप ।
आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।
पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।
सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।
कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।
गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥



... कविराज भूषण



भाषांतर :


यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला तेव्हा राव - राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. इतके ते निर्बल व निस्तेज झाले. थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणार्या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून 'रब'ची चर्चा सुरू झाली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.

3 Jul 2009

कविराज भूषण - भाग ८ - नरसिंह सिवा है ... !

एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।

एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।

भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।

एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥


... कविराज भुषण


भाषांतर :

यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.

1 Jul 2009

कविराज भूषण - भाग ७ - सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ... !

प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों "समाजु आजु कहॉ चली", काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥


... कवीराज भूषण.


भाषांतर :

(या छंदात भूषण कवीने काल्पनिक शिव - पार्वती संवाद वर्णिलेला आहे)प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले,"महाराजा, आज आपली मंडळी कुठे निघाली आहेत? "महादेव म्हणाले,"आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत."