संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.
४१) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र ...
पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्या कारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी कूड़ाळ येथील सुभेदार नरहरी आनंदराव यांना पत्र लिहिले. पत्रामध्ये राजे म्हणतात," बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे."
मिठाचा व्यापार स्वराज्यामध्ये महत्वाचा व्यापार होता आणि त्यावर राजांचे बारीक लक्ष असे.


*****************************************************************************************************************************************************************