1 Apr 2009

भाग ९ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

३४) छत्रपति शिवाजी महाराजांनी २३ जुलै १६४९ रोजी कान्होजी जेधेंना लिहिलेले पत्र ...

शिवाजीराजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात विजापूर आदिलशहाने अफझलखानाकरवी शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. शहाजीराजांसोबत असणाऱ्या नाईक कान्होजी जेधे आणि दादाजी लोहोकरे ह्यांना सुद्धा अटक झाली होती. पुढे सगळ्यांची सुटका झाल्यावर १६४९ मध्ये शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शिवाजीराजांकडे मावळात परत पाठवले होते. ह्याचवेळेस अफझलखानाने जावळीवर स्वारी करण्याचे ठरवले आणि कान्होजी जेधे यांना आपल्या सोबत येण्यास फर्मावले.



शिवाजीराजांना हे कळताच त्यांनी २३ जुलै १६४९ रोजी कान्होजी जेधेंना पत्र लिहून कळवले की,"दगा होये ऐसे न करणे. पूर्ण सावधगिरी बाळगुन जावे."




*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment