2 Apr 2009

भाग ११ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.


३६) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये बेळगाव मधील मुरगुड येथील रुद्राप्पा देसाई यांस लिहिलेले पत्र ...


राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. बेळगाव मधील मुरगुड येथील 'रुद्राप्पा देसाई' यांस राजांनी भुजबळगड जिंकण्याची जबाबदारी दिली होती. मात्र त्याची माणसे तेथे पोचण्यापूर्वीच मारली गेली.

शिवराजांनी ११ डिसेंबर १६७६ रोजी रुद्राप्पा देसाई यांस पत्र लिहुन आपलेसे करण्याचा आणि त्यास उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या पत्रात राजे म्हणतात,"कामगिरींत आलेल्या अपयशाबद्दल खंत न बाळगता अन्य कामात यश मिळवून स्वामीकृपा संपादावी."






*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment