24 Mar 2009

भाग ६ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.


३१) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये बाजीप्रभु देशपांडे यांना लिहिलेले पत्र ...


हिरडस मावळामध्ये जासलोगड़ नावाचा ओस पडलेला एक किल्ला होता. 'त्याचे नाव मोहनगड असे ठेवून तो किल्ला वसवावा' अशी आज्ञा शिवरायांनी बाजीप्रभु देशपांडे यांना आपल्या १३ मे १६५९ रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे.


राजे म्हणतात की,"पिलाजी भोसले यांना २५ माणसे देउन गडाची जबाबदारी द्यावी. त्यांना गडावर बांधकाम करून द्यावे. गडाचे बांधकाम मजबूत असावे व ते एका पावसाळ्यात मोडकळीस येऊ नये." पत्रात अखेर राजे म्हणतात की,"लिहिल्याप्रमाणे किल्ला मजबूत करुनच खाली उतरणे. साहेबांचा (शिवरायांचा) तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे."




*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment