4 May 2009

भाग १८ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४३) छत्रपति शिवाजी महाराजांनी २ सप्टेम्बर १६६० रोजी देशमुख कान्होजी जेधें नाईक लिहिलेले पत्र ...


शहाजीराजांच्या काळापासून स्वराज्यकार्यात हातभार लावणारे देशमुख कान्होजी जेधें नाईक काही कारणाने आजारी पडले. त्यांनी स्वतःच्या जिविताची आशा सोडली. आपले देशमुखीचे वतन महाराजांनी आपल्या मुलांकड़े न चालवले तर त्यांचे कसे होईल ही चिंता त्यांना होती. तशी चिंता त्यांनी राजांना पत्र लिहून कळवली.

पत्रास उत्तर देताना राजे म्हणतात,"तरी आता नवे लिहिणे काय लागले. पहिलेच पासून तुम्हा आम्हात घरोबा आहे." ह्यापत्रात शिवरायांना कान्होजींबद्दल किती आस्था आणि प्रेम होते ते दिसून येते.



*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment