19 May 2009

भाग २४ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.
(पत्ररूप व्यक्तिदर्शन ह्या मालिकेमधले हे शेवटचे पत्र)
४९) छत्रपति शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६५ मध्ये मुघल सेनापती मिर्झाराजा जयसिंह याला लिहिलेले अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

१६६० ते १६६४ पर्यंत अफझलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात हल्ला, मराठा आरमार उभे करून आणि अखेर सूरत बेसूरत करून शिवरायांनी मुघलांना त्राही-त्राही करून सोडले होते. आता औरंगजेबाने त्याचा सर्वात ताकदवर सेनापती मिर्झाराजा जयसिंह याला दख्खन मोहिमेवर पाठवले. त्याच्या सोबत होता दिलेरखान. शिवाजीराजांनी ह्यावेळी मिर्झाराजा जयसिंह याला लिहीलेले पत्र प्रसिद्ध आहे. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे.

पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.

*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment