13 May 2009

भाग २२ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४७) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७८-७९ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले तिसरे अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

छत्रपति शिवाजी महाराजांनी व्यंकोजी भोसले यांस "गृहकलह बरा नव्हे" असे उपदेशात्मक पत्र लिहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते शिवाजी महाराजांना येउन भेटले देखील. पण शिवाजीराजे आपले संपूर्ण राज्यचं हिसकावून घेतील या भीतीने त्यांनी रात्रीच छावणीमधून पळ काढला. आता मात्र शिवाजीराजांनी सर्वत्र मोर्चे बांधले आणि व्यंकोजीची पूर्ण जहागीर ताब्यात घेतली. तंजावर तेवढे मुद्दामून जिंकायचे बाकी सोडले.

'दक्षिण दिग्विजय मोहिम' आटोपून राजे परत रायगडी आले तेंव्हा त्यांना रघुनाथपंत यांसकडून कळले की, ह्या सर्वाने व्यंकोजी भोसले खचून गेले होते आणि त्यांनी वैराग्य धरायच्या गोष्टी सुरु केल्या होत्या. हे कळाल्यावर राजांनी त्यांस पुन्हा पत्र पाठवले.

पत्रात राजे म्हणतात,"कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहेती" शहाजी राजांचे आणि स्वतःचे (शिवरायांचे) उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काही पुरुषार्थ आणि कीर्ति मिळवावी असा कळकळीचा सल्ला छत्रपति शिवाजी महाराजांनी व्यंकोजी भोसले यांस ह्या पत्रात दिला आहे.



*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment