11 May 2009

भाग २१ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४६) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले दुसरे अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

"माहाराजाचे पोटी जाहालियाचे सार्थक केले ऐसे होईल" या आशयाचे पत्र त्यांना शिवाजी राजांनी लिहून सुद्धा व्यंकोजीवर काही परिणाम झाला नाही. व्यंकोजी उलट महाराजांशी फटकून वागला आणि एवढेच नव्हे तर त्याने मराठ्यांच्या फौजेवरच हल्ला केला. अर्थात तो फसला आणि त्यात त्याचा पूर्ण पराभव झाला.

छत्रपति शिवाजी महाराजांनी त्यांस पुन्हा उपदेशात्मक पत्र लिहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ह्या पत्रात राजे म्हणतात,"गृहकलह बरा नव्हे." पुढे ते म्हणतात,"ऐकाल तर बरे. तुम्हीच सुखी पावाल. नाईकाल तरी तुम्हीच कष्टी व्हाल. आमचे काय चालते." ह्या नंतर मात्र व्यंकोजी भोसले शिवाजी महाराजांना येउन भेटले.



*****************************************************************************************************************************************************************

1 comment:

  1. महाराजांचि तत्कालिन पत्रे आनि बोलि वाचने अत्यंत आनददायिइ आहे ... असेच पोस्ट लिहित जा ...
    .
    मनोमन धन्यवाद

    ReplyDelete