16 May 2009

भाग २३ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४८) छत्रपति शिवाजी महाराजांनी जाने-फेब. १६८० मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले चौथे आणि अंतिम अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...

१६७९ च्या शेवट-शेवटला मुघल फौजेने दिलेरखानच्या नेतृत्वाखाली उरल्या-सुरल्या विजापुरला वेढा टाकला होता. विजापुरचा मसूदखान याने विजापुर रक्षावे अशी गळ शिवाजीराजांना घातली तेंव्हा महाराजांनी फौजे सकट जालना - बागलाण - खानदेश अश्या मुघली प्रदेशात स्वारी व लुटालुट चालवली. ह्यामुळे दिलेरखानास विजापूरचा वेढा उठवून स्वतःच्या प्रदेशाच्या रक्षणासाठी येण्यास भाग कसे पडले याचे विवेचन राजांनी पुढील पत्रात केले आहे.

पत्रात राजे म्हणतात,"विजापूरचे अरिष्ट दूर करून विजापूर रक्षिले." खालील पत्रामधून राजांचे रणकौशल्य आणि 'बेरीरगिरी' उर्फ़ फिरत्या लढाईमधली निपुणता लक्ष्यात येते.

*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment