9 May 2009

भाग २० - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४५) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेले अत्यंत महत्त्वाचे असे पत्र ...


राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमे मागचे सूत्र होते. १६७६-१६७७ ह्या २ वर्षात आदिलशाही बरीच खिळखिळी करण्यात राजे यशस्वी देखील झाले. याशिवाय तंजावर येथे त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले राज्य करत होते. त्यांनी स्वराज्य विस्ताराच्या कार्यात आपल्या सोबत यावे असे शिवरायांना वाटत होते.


छत्रपति शिवरायांनी १६७६ मध्ये "माहाराजाचे पोटी जाहालियाचे सार्थक केले ऐसे होईल" या आशयाचे पत्र लिहून त्यांना काही सल्ले दिले. पत्रात राजे म्हणतात,"आपला वाटा तुजजवळ मागावा त्या कामाचा हा कागद नव्हे."


'दक्षिणेमध्ये खवासखानाचा भाऊ नासरखानावर हल्ला करून जिंजी ताब्यात घ्यावी, बहलोलखानाचा हस्तक शेरखान याला मारून त्याचा मुलुख जिंकावा, असे राजकारणी सल्ले राजांनी व्यंकोजीला या पत्रात दिले आहेत.'


शहाजीराजांचा पूत्र म्हणुन राजांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राज्य कसे निर्माण केले आणि मग १६७३ नंतर पन्हाळा, फोंडा आणि सातारा घेउन दक्षिणेकड़े कूच केले आणि विजापुरला कसे पराभूत केले ह्याचे सविस्तार वर्णन यापत्रात त्यांनी लिहिले आहे.




*****************************************************************************************************************************************************************


No comments:

Post a Comment