31 Aug 2009

कविराज भूषण - भाग १८ ... चढत तुरंग चतुरंग साजि सिवराज ... !

चढत तुरंग चतुरंग साजि सिवराज ।

चढत प्रतापदिन दिन अति अंग मै ॥

भूषन चढत मरहट्टन के चित्त चाव ।

खग्ग खुलि चढत है अरिन के अंग मै ॥

भोसिलाके हाथ गढ कोट है चढत अरि ।

जोट है चढत एक मेरू गिरिसृंग मै ॥

तुरकान गन व्योमयान है चढत बिनु ।

मान है चढत बदरंग अवरंग मै ॥


... कविराज भूषण


भाषांतर :

चतुरंग सैन्य सज्ज करून शिवराज घोड्यावर स्वार होतांच त्यांचा प्रताप दिवसेंदिवस (समरांगणात) वाढतो आहे. भूषण म्हणतो, (इकडे) मराठ्यांच्या मनात उत्साह वाढू लागतो, (तो तिकडे) उपसलेल्या तरवारी शत्रूच्या छातीत घुसत आहेत. भोसल्यांच्या हाती (एका मागून एक) किल्ले येऊ लागले (वाढू लागले) तर तिकडे शत्रूंच्या टोळ्या एकत्र होऊन मेरूपर्वताच्या शिखरावर चढू लागल्या. तुर्कांचे समुदाय (युद्धात मरण मिळाल्यामुळे) विमानात बसून आकाशमार्गे जात आहेत (तो इकडे) अवमान झाल्यामुळे अवरंगजेब निस्तेज होत आहे.

30 Aug 2009

कविराज भूषण - भाग १७ - महीपर कीरति श्री सिवराज बगारी ... !

छाय रही जितही तितही अतिहि छबि छीरधि रंग करारी ।

भूषन सुद्ध सुधान के सौधनि सोधति सी धरि ओप उज्जारी ।

योंतम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसी चाँदनि चारू पसारी ।

ज्यों अफजल्लहि मारि महीपर, कीरति श्री सिवराज बगारी ॥

... कविराज भूषण

भाषांतर :

ज्या प्रमाणे क्षीर समुद्रात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे शुभ्रच शुभ्र छबि पसरलेली दिसते किंवा चंद्राने अंधकारास ग्रासून शुभ्र चांदणे पसरावे व त्या प्रकाशात शुभ्र चुने गच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजलखानास मारून पृथ्वीवर आपली उज्वल कीर्ति पसरवली.

29 Aug 2009

कविराज भूषण - भाग १६ - आग्र्याहून सुटका ... !

चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।

कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, एकलिए एक जात जात चले देवा की ।

भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो, धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।

पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो, देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !

27 Aug 2009

कविराज भूषण - भाग १५ - इते गुन एक सिवा सरजामै ... !

सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै ।

सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजामै ।

दान कृपानहु को करीबो करीबो अभै दीनन को बर जामै ।

साहन सो रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजामै ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

भूषण म्हणतो सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व हे गुण यांच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झालेले आहेत; तसेच यांच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; शत्रुंना तरवारीचेच दान व दीनांना अभय वर देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे. बादशहांशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेही कार्य विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा (सिंहासमान शूर अशा) शिवरायांच्या ठिकाणी आहेत.

25 Aug 2009

कविराज भूषण - भाग १४ - हिन्दुपति सेवाने ... !

मन कवी भूषन को सिव की भगति जीत्यो

सिव की भगति जीत्यो साधु जन सेवाने ।

साधु जन जीते या कठिन कलिकाल

कलिकाल महाबीर महाराज महिमेवाने ॥

जगत मै जीते महाबीर महाराजन

ते महाराज बावन हू पातसाह लेवाने ।

पातसाह बावनौ दिली के पातसाह

दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दुपति सेवाने ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

कवी भूषणाच्या मनात शिवभक्तिने ,शिव भक्तिस साधूजनांच्या सेवेने, साधूजनास कलिकालाने,कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि या शूर आणि कीर्तिवान राजास बावन्न बादशहास जिंकणार्‍या (औरंगजेबाने) आणि त्या बावन्न बादशहाच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास "हिन्दू पति" शिवरायांनी जिंकले.
या छंदात कवि भूषणाने शिवाजी महाराजांना "हिन्दूपति" अशी उपमा दिलेली आहे. यावरूनच पुढील काळात मराठी साम्राज्याला हिंदुपतपातशाही म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.

3 Aug 2009

कविराज भूषण - भाग १३ - इते गुन एक सिवा सरजामै ... !

सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै ।

सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजामै ।

दान कृपानहु को करीबो करीबो अभै दीनन को बर जामै ।

साहन सो रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजामै ॥

... कविराज भूषण


भाषांतर :

भूषण म्हणतो सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व हे गुण यांच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झालेले आहेत; तसेच यांच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; शत्रुंना तरवारीचेच दान व दीनांना अभय वर देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे. बादशहांशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेही कार्य विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा (सिंहासमान शूर अशा) शिवरायांच्या ठिकाणी आहेत.


नोंद : माझ्या ब्लॉगवरील 'कविराज भूषण' यांची सर्व काव्ये व भाषांतरे या लिखाणाचे पूर्ण श्रेय माझा मित्र 'ओंकार' याचे आहे.